Barshi bandh called off; Anand Kashid's hunger strike called off
बार्शी विशेष : अंतरवाली सराटीमध्ये मागील ९ दिवसांपासून सुरु असलेले मनोज जारंगे पाटील यांचे आमरण उपोषण स्थगित झाल्यामुळे, बार्शी तहसिल कार्यालयासमोर उपोषणास बसलेले आनंद काशीद यांनीही त्यांचे उपोषण ९ व्या दिवशी स्थगित केले.
कित्येक वर्षापासून सुरु असलेल्या मराठा आरक्षण लढ्याला आणि मागील एक वर्षापासून जरांगे पाटील यांनी केलेल्या आमरण उपोषण व आंदोलनांना मराठा समाजाने भरभरून प्रतिसाद दिला. असे असतानाही शासन मराठ्यांना आरक्षण देऊ शकत नाही ही खंत मराठा समाजाच्या मनात असल्यामुळे येणाऱ्या विधानसभेला मराठा समाज त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही अशी भावना आनंद काशीद यांनी उपोषण सोडताना व्यक्त केली. आधीपासूनच मनोज जरांगे पाटलांच्या सोबत असलेला मराठा समाज पुढील काळातही त्यांचा आदेश शिरसावंद्य मानून काम करेल, आणि बार्शी तालुका त्यामध्ये आघाडीवर राहील यात कुठलीही शंका नसल्याचे आनंद काशीद म्हणाले. गुरुवार २६ सप्टेंबर रोजी पुकारलेला बार्शी बंद मागे घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी विनायक मामा घोडके, विजय अण्णा साळुंखे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
उपोषण सोडविण्यावेळी बार्शीचे नायब तहसीलदार सुभाष बदे, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, मा. नगराध्यक्ष विश्वास बारबोले, मा. पंचायत समिती सभापती युवराज बापू काटे, मा. पंचायत समिती सभापती लक्ष्मण बापू संकपाळ, मा. उपनगराध्यक्ष राहुल कोंढारे यांच्यासह अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.