बार्शी विशेष : जन हिताय, जन रक्षणाय हे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या भगवंत सेना दलाने आत्तापर्यंत अपघातग्रस्तांना केलेल्या मदत कार्याची दखल घेऊन, ग्राहक समिती महाराष्ट्र राज्य च्या वतीने, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीचे व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून भगवंत सेना दलास मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी भगवंत सेना दलाचे प्रमुख धिरज शेळके, सेना दलाचे सदस्य शुभम झोंबाडे, रमेश कानडे, स्वप्निल पवार, विजय माने, विनायक गरड यांनी मानपत्र व सन्मान स्वीकारला. तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या बार्शी येथील ओन्ली समाजसेवा संघटना व जाणीव फाउंडेशन या संघटनांचा देखील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी पांगरी पोलिस स्टेशनचे सपोनि शिवाजी जायपत्रे, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते संजय पाटील, मातृभूमी प्रतिष्ठानचे प्रतापराव जगदाळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नंदकुमार काशीद, घारीचे सरपंच प्रशांत जगदाळे, ग्रामसेवक दर्शन मंडलिक, ग्राहक समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दशरथ उकिरडे, प्रा. मस्तुद आदी मान्यवर तसेच घारी येथील ग्रामस्थ, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

